Chandrashekhar Bawankule : “कॉकरोच आंदोलन म्हणजे एक नौटंकी… सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न”; बावनकुळे यांचा जोरदार प्रहार !
हे कॉकरोच आंदोलन म्हणजे एक नौटंकी आहे. त्यांना कोणतेही वास्तविक मुद्दे सापडत नसल्यामुळे ते तरुणांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा कट रचत आहेत.

Chandrashekhar Bawankule – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नीट पेपरफुटी विरोधीच्या आंदोलनाला नौटंकी (नाटक) असल्याचे म्हटले आहे. परीक्षेतील अनियमिततेबाबतचा संताप हा कृत्रिमरीत्या निर्माण केलेला असल्याचा दावा त्यांनी केला. (Chandrashekhar Bawankule)
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा बचाव करताना त्यांनी या मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीच्या चौकशीची मागणी करून जबाबदारीचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विचारले, आमच्यापैकी कोणत्याही मंत्र्याने पेपर फोडले का? चंद्रशेखर बावनकुळे किंवा धर्मेंद्र प्रधान यांनी कोणताही पेपर फोडला का?, असा सवाल त्यांनी केला. (Chandrashekhar Bawankule)

Chandrashekhar Bawankule : “कॉकरोच आंदोलन म्हणजे एक नौटंकी… सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न”; बावनकुळे यांचा जोरदार प्रहार !
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेकडे जाणाऱ्या हजारो आंदोलकांवर दिल्ली पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलांनी अश्रूधुराचा वापर केल्यानंतर त्यांनी ही टिप्पणी केली. प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता, संसद मार्ग परिसरात त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. (Chandrashekhar Bawankule)
बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नुकसान करण्यासाठी समाजात एका विशिष्ट गटाचा आणि विचारसरणीचा शिरकाव झाला आहे. हे कॉकरोच आंदोलन म्हणजे एक नौटंकी आहे. त्यांना कोणतेही वास्तविक मुद्दे सापडत नसल्यामुळे ते तरुणांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा कट रचत आहेत.
काही तरुण खऱ्या व्यथेपोटी या आंदोलनात सामील झाले आहेत कारण नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे ते अस्वस्थ आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. सरकारने कठोर पावले उचलली, अधिक कडक नियम लागू केले आणि या प्रकरणाची योग्य प्रकारे हाताळणी केली.
सुधारणा सुचवण्याऐवजी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून या मुद्द्याचे राजकारण केले जात आहे. सरकारची बदनामी करण्यासाठी आणि सरकारविरुद्ध रोष निर्माण करण्यासाठीच हे आंदोलन मुद्दाम करण्यात आले, असे बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.





