चेन्नई – हिजाब प्रकरणामुळे लोकांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा उद्योग भारतीय जनता पक्ष करत आहे, अशी टीूका तामिळनाडूतील द्रमुक नेत्या आणि खासदार कनिमोळी यांनी केली आहे.
काय परिधान करायचे हा महिलांचा स्वतःचा प्रश्न आहे, असेही त्या म्हणाल्या. तामिळनाडूतील 38 जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत मतदान केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
भाजप लोकांना धर्माच्या नावाने एकमेकांविरोधात उभे करत आहे, ही दुःखाची बाब आहे. काय परिधान करायचे हा महिलांचा स्वतःचा प्रश्न आहे. ही वस्त्रे खूप लहान किंवा मोठी आहेत, हा मुद्दा गौण आहे, असेही कनिमोळी म्हणाल्या.