Sanjay Raut : शिवसेनेच्या बड्या नेत्याच्या दाव्यावर ठाकरे गटाचे संजय राऊत कडाडले; म्हणाले, “तुम्ही स्वःताह फुटलात ना, तुमच्या कपाळाला बेईमानीची पट्टी…”

मुंबईः महायुती सरकारमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होती. अखेर पालकमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यानंतर काही वेळातच नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालक मंत्री पदांबाबत शासनाने अद्यादेश काढून या पदांना स्थगिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दोऱ्यावर आहेत,
शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे देखील या दौऱ्यावर असून त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. तसेच काँग्रेसचे 5 आमदारही एकनाथ शिंदेंना भेटून गेल्याचा दावा सामंतांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे राज्यात पुढील काही दिवसांत मोठा राजकीय भूंकम पाहिला मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यांच्या या दाव्याचा ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी समाचार घेत त्यांना खडबोल सुनावले.
त्यांना मुंबईला परत पाठवले पाहिजे
उद्योगमंत्री उदय सामंत गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेते किती आमदार, खासदार फुटतील हे दावोसमधून सांगत आहेत. दावोसमध्ये बसून एकनाथ शिंदेंना कोण भेटलं, तीन खासदार भेटले, 10 आमदार भेटले हे गुंतवणूक करत आहेत का? त्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईला परत पाठवले पाहिजे असे राऊत म्हणाले. शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दावा केला होता की, राज्यातील विरोधी काँग्रेस आणि शिवसेनेमधील 10 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. 23 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सामील होतील.
तुम्ही स्वःताह फुटलात आणि…
मूळात दावोस हा काय राजकारण करणयाची जागा आहे का सवाल राऊत यांनी सामंतांना केला आहे. तुम्ही स्वःताह फुटलात ना, तुमच्या कपाळाला बेईमानीची पट्टी लागली आहे. आता संजय राऊत आणि आदित्य ठाकरे, सुनील राऊत हे एकनाथ शिंदेंना भेटले, एवढंच सांगायचं बाकी असल्याचे राऊत म्हणाले. उद्योग वाढवण्यापेक्षा शिवसेना राष्ट्रवादीचे किती खासदार, आमदार फोडत आहोत, कसा धक्का देणार हे दावोसला जाऊन सांगत आहात, हे उद्योगमंत्र्यांचे काम आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.





