Team India : आज होळी पौर्णिमेच्या दिवशी भारतात वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले. हे ग्रहण दुपारी ३:२० वाजता सुरू झाले आणि सायंकाळी ६:४७ वाजेपर्यंत राहिले. एकीकडे शहरांमध्ये होळीनंतर धुळवड साजरी होत रंगांची उधळण सुरू असताना, दुसरीकडे काही लोकांनी ग्रहणाच्या काळात रंग खेळण्यापासून (Team India) दूर राहणे पसंत केले. काहींनी याला अंधश्रद्धा ठरवत सामान्यपणे उत्सव साजरा केला. मात्र, या ग्रहणाचा सर्वाधिक चर्चेत आलेला परिणाम म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) सराव थांबवणे. T20 विश्वचषक २०२६ मध्ये भारताने (Team India) सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. गुरुवार, ५ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) हा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचा सराव आज दुपारपासून नियोजित होता. इंग्लंड संघाने आपला सराव पूर्वनियोजित वेळेनुसार सुरू केला, पण भारतीय संघ व्यवस्थापनाने मुंबईत पोहोचल्यानंतर ग्रहणाची माहिती मिळाल्याने दुपारचा सराव रद्द केला. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने खग्रास चंद्रग्रहणाच्या काळात वानखेडे स्टेडियमवर सराव टाळला. सरावाची वेळ आता संध्याकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठरवण्यात आली आहे. प्रत्यक्षात भारतीय खेळाडू संध्याकाळी ७ वाजल्यानंतर फ्लडलाइट्सखाली सराव करताना दिसतील. ही बाब श्रद्धा की अंधश्रद्धा यावर देशभरात चर्चा सुरू झाली आहे. चंद्रग्रहणाची वेळ (Team India ) चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ: दुपारी 3:20 जास्तीत जास्त ग्रहण: अंदाजे संध्याकाळी 6:33 ते 6:40 ग्रहण संपण्याची वेळ: सायंकाळी 6:47 वैदिक पंचांगानुसार, हे २०२६ चे पहिले चंद्रग्रहण आहे आणि भारतात दिसत असल्याने सुतक आणि इतर विधींचे नियम लागू झाले. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणाचा प्रभाव सर्व १२ राशींवर पडतो आणि शुभ-अशुभ दोन्ही परिणाम होऊ शकतात. T20 विश्वचषक उपांत्य फेरीचे चित्र (Team India) भारताने सुपर ८ मध्ये वेस्ट इंडिजला हरवून उपांत्य फेरीत स्थान मिळवले. ५ मार्च: भारत विरुद्ध इंग्लंड – वानखेडे स्टेडियम, मुंबई (रात्री ७:०० वाजता सुरू). दुसरी उपांत्य फेरी: दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड – ४ मार्च रोजी. विजयी संघ ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळतील.