Suresh Dhas । बीड जिल्ह्यातील मस्सजोगाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केल्याचे फोटो सोमवारी व्हायरल झाल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेले भाजप आमदार सुरेश धस यांनी, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर एक मोठं वक्तव्य केलय आहे. बैठकीबाबत धनंजय मुंडे यांना भूमिका स्पष्ट करावीच लागेल Suresh Dhas । खंडणीबाबत धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत धनंजय मुंडे यांना भूमिका स्पष्ट करावीच लागेल असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. याविषयी बोलताना सुरेश धस म्हणाले की, “सातपुड्याच्या बंगल्यावर खंडणीसाठी भेट झाली की नाही याचं उत्तर धनंजय मुंडेंना द्यावंच लागेल. पदावर असो किंवा नसो इतकं होऊनही मुंडे समर्थकांची भाषा बघा. राजीनामा घेतला तर मंत्रालयाला घेराव घालू म्हणतायत. तुमच्या जवळच्या माणसांनी काय केलं ते पहा.” असेही त्यांनी यावेळी म्हटले. पुढे धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना सुरेश धस यांनी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे. याविषयी बोलताना,”अण्णांशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं. मग संतोष देशमुख यांच्या खुनाचं पान धनंजय मुंडे यांच्या परस्पर कसं घडलं असेल? असा सवाल सुरेश धसांनी विचारला. तर दुसरीकडे रोहित पवारांनी धसांच्या सुरात सूर रोहित पवारांनी मिसळला आहे. याविषयी बोलताना रोहित पवारांनी,“धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा सामान्य लोकांच्या मनातील संतापाच्या उद्रेकाचा आणि देशमुख कुटुंबाच्या संघर्षाचा परिणाम आहे. पण केवळ राजीनामा दिला म्हणून हा विषय इथंच संपत नाही, तर संतोष देशमुख खून प्रकरणी आणि आवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्यांना सहआरोपी करून पारदर्शक तपास करण्याची आणि सुधारित चार्जशीट दाखल करण्याची गरज आहे. तरच संतोष देशमुख यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. त्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडू,” असे म्हटले आहे. धनंजय मुंडे यांना सहआरोपी करायला हवं Suresh Dhas । देशमुख कुटुंबाची आणि सर्वसामान्यांची अजून एक मागणी आहे की धनंजय मुंडे यांना सहआरोपी करायला हवं. कारण त्या कंपनीकडून पैसे मागण्याची बैठक ही धनंजय मुंडेंच्या घरी झाली होती, असं भाजपचा आमदार पुराव्यासह जर म्हणत असेल तर मग सहआरोपी करुन पारदर्शकपणे याची चौकशी होणं महत्त्वाचे असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. तर भाजप नेते सुरेश धस यांनीही सातपुड्याच्या बंगल्यावर खंडणीसाठी भेट झाली की नाही याचं उत्तर धनंजय मुंडेंना द्यावंच लागेल, असे म्हटले आहे. हेही वाचा जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका….