शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासातील सुरु असलेली मोडतोड कधीही खपवून घेणार नाही. आज साडेतीनशे वर्षांनंतरही शिवाजी महाराजांच शौर्य कोणालाही सांगायची गरज भासत नाही. त्यांचं कार्य हे प्रत्येकाच्या नसानसात भिनलेले आहे. माझा आणि शिवभक्तांचा कोणत्याही चित्रपटाला किंवा कोणत्याही अभिनेत्याला अजिबात विरोध नाही. मात्र, इतिहासात केल्या जाणाऱ्या मोडतोडीला सहन केले जाणार नाही, असा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
“एकनाथ शिंदेंना कवडीचीही किंमत…”बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल मिटकरींची टीका
बेळगाव मधील होणगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी अनावरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार सतीश जारकीहोळी हे होते. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अविस्मरणीय प्रसंग आहे. शिवाजी महाराजांचा आपलं राज्य स्वराज्य नाही सुराज्य व्हावं असा संकल्प होता. महाराजांचे आचार विचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे. महाराज जसे आत्मचिंतन करत असे आपण केले पाहिजे ही सर्व शिवभक्तांची जबाबदारी आहे.”
#बेळगाव मधील “होणगा” येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे अनावरण केले… pic.twitter.com/lo7cHjWrMI
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 18, 2022
“छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसे स्थापन केले, परकियांना कसे परतावून लावले, अफजलखानाचा वध कसा केला अशी अनेक उदाहरणे मी देऊ शकतो. मात्र हा कार्यक्रम कर्नाटकात होत आहे म्हणून मी मुद्दाम सर्वांना महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाचे एक आठवण सांगतो. जेंव्हा छ. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले. दक्षिण दिग्विजय हा फक्त कर्नाटक नव्हे तर खाली थेट तामिळनाडू -जिंजी पर्यंत होता. जेंव्हा छ. संभाजी महाराज मारले गेले. तेंव्हा मराठा साम्राज्य 8 ते 9 वर्षे शिवरायांचे पुत्र छ. राजाराम महाराज यांनी जिंजी येथून चालविले. त्यामुळे छ. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते तर देशभर त्यांचे कार्यक्षेत्र होते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही”, असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.