मुंबई – राज्यात नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका जाहीर झाल्याचा आम्हाला धक्का बसला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले.
बांठीया समितीने त्यांचे काम पूर्ण करून दिल्यानंतर आता होणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहीत होण्याची गरज आहे, अशी पक्षाची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
जर या निवडणुका ओबीसी आरक्षणासहीत होत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सर्व ठिकाणी 27 टक्के जागांवर ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देईल, असा निर्धार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नये अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी अगोदरच जाहीर केले आहे.