पौड- कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टिमुळे झालेल्या महाभयंकर पूर परिस्थिती मुळे उद्ध्वस्त झालेल्या हजोरो नागरिकांचे संसार उभारण्यासाठी श्री संत तुकाराम साखर कारखान्याच्या वतीने पुरग्रस्तांना 5 लाखांची मदत जिल्हाधिकारी नवल राम यांच्याकडे मदत सुपूर्त करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे संचालक अनिल लोखंडे, सुभाष मोरे, सचिव मोहन काळोखे, कामगार युनियनचे सदस्य सुभाष शितोळे आणि बाळू वाघोले उपस्थित होते. कारखान्याच्या संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाने संयुक्त रित्या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत म्हणून ही रक्कम जिल्ह्याधिकाऱ्यांकडे जमा केली आहे.