Chhattisgarh encounter : छत्तीसगडमधील बिजापूर येथे रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३१ नक्षलवाद्यांना ठार केले. ही चकमक डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर यांच्या संयुक्त पथकाने आणि माओवाद्यांमध्ये विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान क्षेत्र समिती परिसरातील जंगलात घडली. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात AK-47, SLR, INSAS रायफल, BGL लाँचर आणि स्फोटके जप्त केली आहेत. २०२५ मध्ये ४ मोठ्या चकमकी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवानही शहीद झाले आहेत, तर दोघे जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी सैनिकाची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. या वर्षी छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी चार मोठ्या चकमकी झाल्या आहेत. पहिल्या चकमकीत पाच नक्षलवादी मारले गेले. दुसऱ्या चकमकीत १२, तिसऱ्या चकमकीत ८ आणि आता चौथ्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार केले आहेत. चार महिन्यांत २७४ नक्षलवादी ठार गेल्या १४ महिन्यांत सुरक्षा दलांनी छत्तीसगडमध्ये २७४ नक्षलवाद्यांना ठार केले. या काळात ११६६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आणि ९६९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या वर्षी आतापर्यंत राज्यात ८१ नक्षलवादी मारले गेले आहेत, त्यापैकी ६५ बस्तर विभागातील होते, ज्यामध्ये विजापूरसह सात जिल्हे समाविष्ट आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या चकमकीत २१९ नक्षलवाद्यांना ठार मारले. बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांच्या मते, विविध सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या आणखी वाढू शकते, असे सांगितले जात आहे. छ्त्तीसगड नक्षलमुक्त करण्याची घोषणा बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहीतनुसार, १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकीत ५० हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या चकमकीत २९१ नक्षलवादी ठार झाले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर राज्यात नक्षलविरोधी मोहिमेला चांगलाच वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत राज्य नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे.