मुंबई – ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी भाजप आमदार राहुल कुल यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यात तब्बल 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भलं मोठं पत्र लिहित या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी केली.
त्यांनतर सरकारमधील अनेक मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराची एकूण 17 प्रकरणं माझ्याकडे आहेत, असा दावा करत या घोटाळ्यांची कागदपत्रे फडणवीसांना पाठवणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानंतर आता मालेगावातील कॅबिनेट मंत्री, शिवसेना नेते दादा भुसे यांच्यावर संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत.
खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (20 मार्च) रात्री ट्विट करत कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचं नाव घेऊन गंभीर आरोप केले. दादा भुसे यांच्या गिरणा अॅग्रो कंपनीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले.पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले.
ही लूट आहे.लवकरच स्फोट होईल.@dir_ed@Dev_Fadnavis pic.twitter.com/fYuLIZEhEL— Sanjay Raut (@rautsanjay61) March 20, 2023
संजय राऊतांनी सोमवारी रात्री केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ” हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत.गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. असा आरोप त्यांनी केला असून पुढे संजय राऊतांनी “ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल… ” असं म्हणत मंत्री भुसेंना इशारा दिला आहे.
Bihar Politics : राजकीय अफवांवर तेजस्वी यादवांचे स्पष्टीकरण, म्हणाले “ना नितीशकुमार यांना; ना मला….”
विशेष म्हणजे राऊंतानी ईडी आणि देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलंय. त्यामुळे हा स्पष्टपणे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेला इशारा समजला जातोय.