संजय राऊत यांचे पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान ; म्हणाले,” त्यांचं डोकं…”

Sanjay Raut on Prime Minister । आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते संजय राऊत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी यावेळी पंतप्रधानांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत राऊत यांनी “त्यांचे मानसिक संतुलन ठीक नाही.” असे विधान केले. याशिवाय त्यांनी निवडणूक आयोगावर पक्षपाताचा गंभीर आरोपही केला.
पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान Sanjay Raut on Prime Minister ।
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलतील हे माहीत नाही. त्यांचे मानसिक संतुलन कळत नाही. त्यांचे मन सडलेले आहे. झारखंडमध्ये जर कोणतीही योजना चुकीची असेल तर. महाराष्ट्रात ते कसे योग्य आहे? असे वादग्रस्त विधान राऊत यांनी केले.
निवडणुकीतील आरोपांवरही प्रश्न उपस्थित Sanjay Raut on Prime Minister ।
निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले, “या देशात निवडणूक आयोग आता स्वतंत्र राहिलेला नाही. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरूनच निवडणुका जाहीर करतो. राज्यात महापालिका निवडणुका होत नाहीत. कारण भाजपचा पराभव होणार आहे हे निवडणूक आयोगाला माहीत आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर निशाणा साधत ते म्हणाले, “मुख्यमंत्री निवडणुकीबद्दल बोलतील का? ते फक्त तारखा देत आहेत. निवडणूक कधी होणार हे निवडणूक आयोगाने सांगावे, असे ते एकनाथ शिदें सांगत आहेत,”





