S. Jaishankar : “शेजारी प्रथम धोरणाचे मालदीव हे ठळक उदाहरण”; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली – मालदीव हा भारताच्या शेजारी प्रथम धोरणाचे अत्यंत ठोस उदाहरण आहे. भारत नेहमीच मालदीवच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील भारतभेटीवर आले असून त्यांच्याबरोबरच्या चर्चेच्या निमित्ताने जयशंकर बोलत होते.
जयशंकर यांनी भारत आणि मालदीव यांच्यातील सीमापार व्यापारासाठी स्थानिक चलनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आराखड्याला अंतिम रूप देण्यासोबतच आर्थिक ताणतणावांना तोंड देण्यासाठी नवी दिल्लीच्या आर्थिक मदतीची नोंद केली. भारताच्या अनुदान सहाय्याद्वारे मालदीवमध्ये फेज-३ अंतर्गत उच्च प्रभाव असलेल्या समुदाय विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही बाजूंनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
खलील यांनी भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीसाठी संयुक्त दृष्टीकोन साकार करण्यासाठी भारतासोबत जवळून काम करण्यासाठी अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. व्यापार आणि गुंतवणुकीसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठीचे पर्याय शोधण्आसाठी खलील गुरुवारी तीन दिवसांच्या भेटीवर येथे आले आहेत. मालदीव गेल्या काही महिन्यांपासून काही आर्थिक तणावाखाली आहे. आणीबाणीच्या गरजेच्या वेळी मालदीवला भारताने वेळेवर केलेल्या आर्थिक मदतीचे खलील यांनी कौतुक केले.
स्थानिक चलनाच्या वापरासाठीच्या आराखड्यासाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. दोन्ही देशांदरम्यानच्या ४०० दशलक्ष डॉलरच्या चलन स्वॅप लाइनचा उल्लेख जयशंकर यांनी केला. मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रातील भारताच्या प्रमुख सागरी शेजारी देशांपैकी एक आहे आणि संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रांसह एकूण द्विपक्षीय संबंधांमध्ये मालेच्या मागील सरकारच्या काळात वाढ झाली आहे.
आम्ही मालदीवमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यातीचीही सोय केली आहे. आमच्या नात्यात ही खूप परंपरा आहे, असे जयशंकर यावेळी म्हणाले. जयशंकर आणि खलील यांनी ऑक्टोबरमध्ये अध्यक्ष मुइझ्झू यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्यांवर झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला.





