Ravi Kishan On Arvind Kejriwal : ‘२१ दिवसांनी पुन्हा तुरूंगात जायचे आहे’; रवी किशन यांनी केजरीवालांना डिवचले

Ravi Kishan On Arvind Kejriwal – देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार आले तर अमित शहा यांना पंतप्रधान केले जाईल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हटवले जाईल असे दावे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते.
त्याला भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रवी किशन यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की ‘कोणाला ५० दिवस तुरूंगात ठेवले आणि बाहेर आल्यावर हे लक्षात आले की त्यांचा पक्ष दिल्ली आणि पंजाबमध्ये पराभूत होतो आहे तर त्याचा परिणाम होतोच. अशा दशेत माणसाची बुध्दी थोडीतरी फिरतेच’. असं ते म्हणाले.
केजरीवाल यांना लक्ष्य करताना ते पुढे म्हणाले तुम्ही तुरूंगात आहात. मद्य घोटाळ्यात आरोपी आहात आणि तुम्हाला २१ दिवसांनी पुन्हा तुरूंगात जायचे आहे. तर माणूस असेच काहीतरी बोलतो आम्ही त्यांची दश समजू शकतो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष संघटना सर्व स्तरातील लोकांना सोबत घेउन पुढे जात आहेत अशी टिप्पणीही त्यांनी केली.





