Earthquake News : रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून चिपळूण तालुक्यातील येगाव परिसरात याचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.७ इतकी नोंदवण्यात आली आहे. (Earthquake News) महिनाभराच्या अंतरात दुसऱ्यांदा भूकंप झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी १२ मार्च रोजीही जिल्ह्यातील काही भागात अशाच प्रकारचे धक्के जाणवले होते. (Earthquake News) दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. मात्र, वारंवार जाणवणाऱ्या या सौम्य धक्क्यांमुळे चिपळूण आणि आसपासच्या गावांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली असून नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. (Earthquake News) हेही वाचा : Japan earthquake: 7.5 तीव्रतेचा भीषण भूकंप; जपानमध्ये त्सुनामीचा इशारा Earthquake tremors : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण