Raj Thackeray : सरकार आंदोलनाची जागाच संपवण्याच्या तयारीत; वांगचुक यांच्या आंदोलनावरुन राज ठाकरेंची केंद्रावर टीका
पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार कदाचित देशातील आंदोलनाची जागाच संपवण्याच्या निर्णयाप्रत आले असावे, असे ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray : पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषणावरून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार कदाचित देशातील आंदोलनाची जागाच संपवण्याच्या निर्णयाप्रत आले असावे, असे ठाकरे म्हणाले.
वांगचुक हे २८ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात (Raj Thackeray) सहभागी झाले होते. तेव्हापासून ते परीक्षेतील अनियमितता आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणावर आहेत.
एक्सवरील एका पोस्टमध्ये ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रश्न उपस्थित केला की, अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांची लूट होत असताना हे सरकार मूक प्रेक्षक बनून राहू शकते, तर नागरिकांच्या आंदोलनाचा त्यांच्यावर काय परिणाम होणार? ज्या संस्थांनी निष्पक्षपणे काम करायला हवे, त्या संस्थांना हाताशी धरले गेले आहे आणि विशिष्ट अजेंडा साध्य करण्यासाठी निवडणुकांमध्ये फेरफार केले जात आहेत.
यासाठी प्रचंड पैसा खर्च केला जात आहे, तरीही मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे या निधीच्या स्रोताबाबत प्रश्न विचारण्यात अपयशी ठरत आहेत, असा आरोप केला. वांगचुक यांच्या आरोग्याबाबतचे अहवाल आणि माध्यमांवरील दृश्ये नक्कीच चिंताजनक आहेत. हे सांगणे अत्यंत वेदनादायी आहे, परंतु असे दिसते की सरकारने सोनम वांगचुक यांचा बळी देण्याचा आणि पर्यायाने देशातील आंदोलनाची जागाच संपवण्याचा निर्णय घेतला आहे, असे ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray : सरकार आंदोलनाची जागाच संपवण्याच्या तयारीत; वांगचुक यांच्या आंदोलनावरुन राज ठाकरेंची केंद्रावर टीका
भाजप एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या सोयीनुसारच महत्त्व देते
एखाद्या चांगल्या उद्देशासाठी केलेले आंदोलन दडपून टाकणे, आंदोलनकर्त्याला शारीरिक त्रास देणे सरकारला खूप सोपे वाटते. एक काळ असा होता जेव्हा भाजप सोनम वांगचुक यांचा खूप आदर करायचा. भाजप एखाद्या व्यक्तीला केवळ स्वतःच्या सोयीनुसारच महत्त्व देते, असे ते म्हणाले.
नीट परीक्षेबाबत निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती हाताळणे, त्यासाठी जबाबदार असलेल्या मंत्र्याला पदावरून दूर करणे आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करणे या वांगचुक यांच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्यात काहीही चुकीचे नाही.
भाजपच्या कार्यकाळात परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता दिसून आली आहे. यात मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा आणि नीट पेपरफुटीपासून ते अलीकडेच शिक्षक भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्यापर्यंतच्या घटनांचा समावेश आहे, असे ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.





