सुरेंद्रनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील प्रचारसभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा खरपूस समाचार घेत म्हटले आहे की, जे खूप पूर्वीच सत्तेतून बाहेर फेकले गेले आहेत ते पुन्हा सत्तेत येण्यासाठी यात्रा काढत आहेत.
सुरेंद्रनगर शहरातील एका सभेला संबोधित करताना त्यांनी म्हटले आहे की, अनेक जण गुजरातचे मीठ खाऊनही गुजरातला दूषणे देत आहेत. देशातील एकूण मिठाच्या उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन गुजरातमध्ये होते.
नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपसाठी स्वीडनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री फडणवीस
मेधा पाटकर यांच्या अनुषंगाने मोदी यांनी या भारत जोडो यात्रेवर टीका केली. ते म्हणाले की, ज्यांनी 40 वर्षे नर्मदा धरण प्रकल्प रखडवला त्यांच्यासोबत ते चालत आहेत. नर्मदा धरण प्रकल्प रखडवणाऱ्यांना शिक्षा देण्याचा निर्णय गुजरातच्या जनतेने घेतला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
વારંવાર સત્તાધારી પક્ષ ભાજપમાં વિશ્વાસ મૂકીને ગુજરાતે “પ્રો-ઇન્કમ્બન્સી” નામે એક નવી રાજકીય સંસ્કૃતિનો દેશને પરિચય કરાવ્યો છે. pic.twitter.com/iqtyh20KkJ
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2022
मोदी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी कॉंग्रेसचे लोक मला औकात दाखवू असे शब्दप्रयोग करीत आहेत पूर्वी कॉंग्रेसने माझ्यासाठी “नीच आदमी’, “मौत का सौदागर’, “नाली का कीडा’ असे शब्द वापरले होते. आता निवडणुकीच्या काळात विकासावर बोलण्याऐवजी कॉंग्रेसचे नेते मोदींना त्यांची औकात दाखवू असे म्हणत आहेत. मोदी हे केवळ जनतेचे सेवक आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.