sunil Lahri : …हा त्यांचा मोठेपणा; PM मोदींच्या व्हिडिओनंतर रामायण मालिकेतील लक्ष्मणाची रिअॅक्शन चर्चेत म्हणाले ‘जय श्री राम’
sunil Lahri : यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी इंन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.

sunil Lahri : गेल्या काही दिवसांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून देशातील तरुणांशी संवाद साधताना दिसत आहे. काल (शुक्रवार) रात्री ११ ते पुन्हा एकदा इंन्स्टाग्रामवर लाईव्ह आले होते. त्यांनी देशातील तरुणांसोबत साधताना त्यांच्यावर आणि त्यांच्या स्वर्गीय आईबाबत वापरण्यात आलेल्या अत्यंत हीण दर्जाची विधानावर प्रतिक्रिया देत तरुणांना माफ केल्याचं म्हटलं. यानंतर आता यावर टेलिव्हिजनवर गाजलेल्या रामायण या मालिकेतील लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनी भाष्य करत मोदींचे कौतुक केले आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी इंन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.
अभिनेते सुनील लहरी यांनी इंन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या भूमिकेचे कौतुक केले. आंदोलनादरम्यान पंतप्रधान, त्यांच्या दिवंगत आई आणि भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आल्याचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, “अशा परिस्थितीतही सर्वांना माफ करण्याची भूमिका घेणे हे मोठ्या मनाचे लक्षण आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासारखे नेतृत्व देशाला लाभणे ही भाग्याची बाब आहे. त्यांनी देशवासीयांना सकारात्मक राहण्याचे आवाहन केले असून हा त्यांचा मोठेपणा आहे.” असं लहरी म्हणाले आहेत. व्हिडिओचा शेवटी त्यांनी ‘जय श्री राम’ या घोषणेने केला.
View this post on Instagram
मोदींनी व्यक्त केली खंत
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी इंन्स्टाग्रामवरील व्हिडिओत तरुणांना उद्देशून बोलताना आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेबाबत खंत व्यक्त केली. तसेच चुकलेल्या तरुणांना समाजाने योग्य मार्ग दाखवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं. संबंधित व्हिडिओ आणि संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
नेमकं व्हिडिओत नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“मित्रांनो, आज मला तुमच्याशी बोलावेसे वाटते. जंतर मंतरवर जे घडले ते देश आणि जगाने पाहिले आहे. काही खोडकर मुलांनी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली, जी सुसंस्कृत समाजाला शोभणारी नाही. असे शब्द वापरले गेले; मला शिवीगाळ झाली आणि माझ्या दिवंगत आईलाही शिवीगाळ झाली. पण आज मला या वस्तुस्थितीबद्दल बोलायचे आहे की, लहानपणी चुका होतात. बालपण चुका सुधारण्याची संधीही देते. त्यामुळे समाजातील संताप मी चांगल्या प्रकारे समजू शकतो. एक सांस्कृतिक धक्का बसला आहे: आपल्या मुली अशी भाषा कशी वापरू शकतात? आता या मुलांना आपलेसे करण्याची आणि त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची वेळ आली आहे. ही भरकटलेली मुले आहेत आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणे हे आपले काम आहे.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.





