Parth Pawar : पंतप्रधान मोदी घेणार अंतिम निर्णय.! पार्थ पवारांच्या केंद्रीय मंत्रिपदावरून सुनेत्रा पवारांना पत्र, काय लिहले पाहा…
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांना आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळावे, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे.

Parth Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांना आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळावे, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच असेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील पदाधिकारी उदय अहिरे यांनी उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख सुनेत्रा पवार यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी पार्थ पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी केली होती. या पत्रानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने पक्षाला अधिकृत स्पष्टीकरण द्यावे लागले.
पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पार्थ पवार यांनी केंद्रीय मंत्री व्हावे, अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असणे स्वाभाविक आहे. उदय अहिरे यांनी केवळ कार्यकर्त्यांच्या याच भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत, त्यात काहीही वावगे नाही.
एनडीएचा एक घटक पक्ष म्हणून आगामी काळात जेव्हा कधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला त्यात प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा पक्षाला आहे. परंतु, कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचे हा सर्वस्वी पंतप्रधानांचा विशेष अधिकार आहे, असे
ही पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच याबाबतचा निर्णय स्वतः पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना घ्यावा लागेल.
पार्थ पवार हे एक तरुण नेते असून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास पक्ष संघटना अधिक मजबूत होईल आणि पक्षाचा विस्तार होण्यास मदत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो. पार्थ पवार यांनी याच वर्षी एप्रिल महिन्यात राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली आहे.
कामाची बातमी :
Supreme Court : निधीची कमतरता हे कारण खपवून घेणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना कडक निर्देश






