PMC Election : निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, लोकांच्या प्रेमाने भारावून गेलो; अमोल बालवडकरांनी व्यक्त केल्या भावना

बालेवाडी : येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा पारंपरिक पॅटर्न बदलताना दिसत असून, “निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे. मी मतदारांच्या भेटीला जातोच, पण आता अनेक ठिकाणी मतदार स्वतःहून माझ्या भेटीसाठी पुढे येत आहेत. ही निवडणूक केवळ प्रचाराची नाही; हा विश्वासाचा जनआंदोलनासारखा प्रवास आहे,” अशी भावना उमेदवार अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांत विविध परिसरांत नागरिक, सोसायटी प्रतिनिधी, युवक-युवती, महिला मंडळे, व्यापारी संघटना आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने स्वतःहून भेटीला येत आहेत. “मी एखाद्या ठिकाणी पोहोचण्याआधीच नागरिक जमा झालेले असतात. अनेकजण फोन करून ‘आम्हीच येतो, भेटायचं आहे’ असं म्हणतात. ही ऊर्जा शब्दांत सांगता येणार नाही,” असे बालवडकर म्हणाले.
सातत्याने 11 वर्ष जनतेची केलेली सेवा हेच याचे एकमेव कारण आहे, जनतेची ही काम करणाऱ्या माणसाला साथ हेच लोकशाहीचं खरं रूप आहे,” असे सांगत त्यांनी नागरिकांच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी त्यांनी पुढे नमूद केले की, “ही साथ म्हणजे माझ्यावरचा वैयक्तिक सन्मान नाही; हा प्रभागाच्या भविष्यासाठीचा जनादेश आहे. लोकांना काम हवं आहे आणि मी विकास करणार माणूस. मी प्रत्येक भेटीत एकच शब्द देतो: संवाद, पारदर्शकता आणि काम.”
मला विश्वास आहे प्रभाग क्रमांक 9 मध्ये गायत्री मेढे ( कोकाटे ), बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण, अमोल बालवडकर यांना घड्याळ निशाणीवर प्रचंड मतांनी लोक निवडून देतील.





