PBKS vs RCB Shreyas Iyer angry on Virat Kohli after Celebration : आयपीएल २०२५ मध्ये रविवारी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एक जबरदस्त सामना झाला. या सामन्यात आरसीबीने ७ विकेट्सने विजय मिळवला आणि ४८ तासांत पंजाबकडून बदला घेण्यात यश मिळवले. हा सामना खूपच रोमांचक होता, जिथे विराट कोहलीची अद्भुत आक्रमकता दिसून आली. तथापि, सामन्याच्या शेवटी कोहली आणि पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यात थोडीशी विचित्र बाचाबाची झाली.
आरसीबीच्या विजयानंतर विराटने केले आक्रमक सेलिब्रेशन –
खरंतर, शुक्रवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आले. जिथे पंजाबने सामना जिंकला होता. त्यानंतर आरसीबीने पंजाबच्या होमग्राउंडमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा दारुण पराभव केला. एक प्रकारे आरसीबीने मागील सामन्यातील बदला घेतल्यासारखे वाटत होते, पण सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने एक विचित्र सेलिब्रेशन केले, ज्यामुळे पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर नाराज दिसला. यानंतर तो विराटशी काही तरी बोलताना दिसला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
However old you get, never lose the kid in you 😂❤️#PBKSvsRCB #ViratKohli #ShreyasIyer
pic.twitter.com/mPDkVjuG3v— Vaibhav 🤍 (@ProfessorDhond) April 20, 2025
विराटवर संतापला श्रेयस अय्यर –
No one is happy with other team players celebrating, other team players also celebrate wildly winning against rcb.#ViratKohli #ShreyasIyer#PBKSvsRCBpic.twitter.com/nu6p5wuFiZ
— Rohit Sharma (@R0hit_SharmaX) April 20, 2025
साधारणपणे, विराट कोहली मैदानावर बराच सक्रिय दिसतो. विकेट्स पडल्यानंतर किंवा मोठे शॉट्स खेळल्यानंतर त्याच्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिसून येतात. त्याचप्रमाणे, आज पंजाब विरुद्ध जिंकल्यानंतर, त्याने अय्यरला चिडवल्यासारखे एक अद्भुत सेलिब्रेशन केले. पण नंतर दोघांमध्ये एक छोटासा वाद दिसून आला. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते समिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की अय्यर कोहलीच्या सेलिब्रेशनवर रागावला होता, म्हणूनच दोघांमध्ये वाद झाला.
हेही वाचा – MI vs CSK : आयुष म्हात्रेचे धमाकेदार पदार्पण! मुंबईची धुलाई करत सीएसकेसाठी रचला इतिहास
विराट-श्रेयसच्या वादावर चाहत्यांच्या समिश्र प्रतिक्रिया –
पण, काही लोक म्हणतात की दोघांमध्ये मजा आणि मस्ती दिसून आली. आता त्या दोघांनाच माहित नेमकं त्यांच्यामध्ये काय घडलं.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उत्तम खेळ दाखवून पंजाब किंग्जला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवून बदला घेतला.खरंतर, गेल्या शुक्रवारी पंजाबने आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते, त्यानंतर आरसीबीने प्रत्युत्तर देत आजचा सामना ७ विकेट्सने जिंकला आहे. या सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले.