यात काँग्रेसच्या डॉ. वर्षा गायकवाड (उत्तर मध्य मुंबई), डॉ. नामदेव किरसान (गडचिरोली-चिमूर), डॉ. प्रशांत पडोळे (भंडारा-गोंदिया), प्रणिती शिंदे (सोलापूर), श्यामकुमार बर्वे (रामटेक), शोभा बच्छाव (धुळे) आणि डॉ. कल्याण काळे (जालना) यांचा समावेश आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (बारामती) आणि धैर्यशील मोहिते (माडा) पूर्ण १९ दिवस हजर राहिले. भाजपचे अनुप धोत्रे (अकोला), शिवसेनेचे रवींद्र वायकर (उत्तर पश्चिम), माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजाभाऊ पराग वाझे (नाशिक) यांची लोकसभेत शंभर टक्के उपस्थिती राहिली.
हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर दरम्यान चालले. या अधिवेशनात १९ दिवस कामकाज झाले. महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातून लोकसभेत सर्वाधिक काँग्रेसचे १३, भाजपचे ९, ठाकरसेनेचे ९, शरद पवार पक्षाचे ८, शिंदेसेनेचे ७ आणि अजित पवार पक्षाचा एक खासदार आहे.
महाराष्ट्रातील पाच खासदार १८ दिवस, तीन खासदार १७ दिवस, सात खासदार १६ दिवस, चार खासदार १५ दिवस, तीन खासदार १४ दिवस, एक खासदार १३ दिवस, दोन खासदार १२ दिवस आणि दोन खासदार १० दिवस उपस्थित होते. याशिवाय प्रत्येकी एक खासदार ९, ८ आणि ६ दिवस हजर होते. देशभरातील खासदारांची सरासरी उपस्थिती बघितली तर ती १६ दिवस असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.