Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) समोर अंतर्गत गळतीचे आव्हान कायम असल्याचे दिसत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी साथ सोडल्यानंतर आता आणखी एका मोठ्या नेत्याच्या संभाव्य निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics) परभणीचे खासदार संजय जाधव हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. यामागचे कारण म्हणजे ‘मातोश्री’वर बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला त्यांनी पुन्हा एकदा अनुपस्थिती दर्शवली. या बैठकीला अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर तसेच आमदार राहुल पाटील उपस्थित होते. (Maharashtra Politics) दरम्यान, कौटुंबिक विवाह समारंभामुळे बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असे स्पष्टीकरण संजय जाधव यांनी दिले आहे. मात्र, त्याच काळात ते मतदारसंघातील कार्यक्रमांमध्ये सक्रिय दिसल्याने शंका अधिकच वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीही मार्च महिन्यात उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीलाही जाधव अनुपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Maharashtra Politics) या बैठकीला परभणीचे जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद अहिरराव आणि चार तालुका प्रमुख देखील अनुपस्थित होते. चार दिवसांपूर्वी परभणीतील गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत संजय जाधव यांनी आपल्या मनातील नाराजी उघडपणे व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Politics)