PCB – पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ( PCB ) आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांच्या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. जय शाह यांनी म्हटले होते की, “आशिया चषक 2023 ची स्पर्धा आम्ही तटस्थ ठिकाणी खेळू. आमचा संघ पाकिस्तानमध्ये खेळणार का याला परवानगी द्यायची की नाही हे सरकार ठरवत असते. त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करणार नाही पण 2023 च्या आशिया चषकासाठी ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.” जय शाह यांच्या याच वक्तव्यावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) मीडिया रिलीझमध्ये आपले म्हणणे मांडले आहे.
त्याचबरोबर बीसीसीआय सचिवांनी केलेले विधान आशियाई क्रिकेट परिषद किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी कोणतीही चर्चा किंवा सल्लामसलत न करता केले आहे. याबाबत आमच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. असेही पीसीबीने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.
#INDvsAUS | मोहम्मद शमीची ‘ती’ एक ओव्हर अन कांगारूंचा खेळ खल्लास, पाहा व्हिडिओ
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB ) आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “अशा विधानांचा एकूण परिणाम आशियाई आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायांमध्ये फूट पाडू शकतो. आगामी काळात आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ साठी पाकिस्तान संघाने भारतात न जाणे २०२४-२०३१ या काळात भविष्यातील आयसीसी स्पर्धांवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो.”
त्याचबरोबर पीसीबीने म्हटले की, “आतापर्यंत एसीसी अध्यक्ष जय शहा यांच्या वक्तव्यावर पाकिस्तान बोर्डाला कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण मिळालेले नाही. अशा परिस्थितीत पीसीबीने आता आशियाई क्रिकेट परिषदेला या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी बोर्डाची तातडीची बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे.”
या सर्व प्रकरणाचा एकूणच विचार केला तर, आगामी काळातील आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार असे म्हटले जात आहे. असे झाल्यास दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आगामी काळात एकदिवसीय विश्वचषक खेळायला पाकिस्तानी संघ भारतात येणार नाही असे, सूचक विधान केले आहे.