बलुच बंडखोरांकडून नेहमी अशा प्रकारे सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी स्फोट घडवून आणले जातात. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुग्ती यांनी या स्फोटाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. हा एक दहशथवादी हल्ला होता, असे त्यांनी म्हटले आहे.
\nइराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बलुचिस्तानमध्ये दीर्घकाळापासून हिंसाचारी कारवाया होत आहेत. तेल आणि खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या बलुचिस्तानमध्ये पाक सरकार आणि चीनच्या सहकार्याने चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत ६० अब्ज डॉलरच्या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत.
\nबॉम्बस्फोटाचे नेमके कारण काय?
\nदरम्यान, हा बॉम्बस्फोट नेमका कोणी घडवून आणला, यामागे नेमका कोणाचा हात आहे? हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच या बॉम्बस्फोटाची जबाबदारीही अद्याप कोणी स्वीकारलेली नाही. या घटनेनंतर आता बलुचिस्तान परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.