Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’बाबत संजय शिरसाट यांचं बेधडक विधान
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे ७ खासदार आणि काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या बातम्यांनी आधीच राज्यातील राजकारण तापले असताना, आता महायुतीच्या बड्या नेत्यांनी यात उडी घेतली आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली असून ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या दाव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले आहे. Maharashtra Politics()
माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, “आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर राबवत नाही. मात्र, ज्यांना आमच्यासोबत यायचे असेल त्यांना आम्ही नकार देणार नाही. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. योग्य वेळ आली तर पुढचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.” (Maharashtra Politics)
शिरसाट यांच्या या विधानानंतर ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार का, याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. आगामी काही महिन्यांत अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात, असे सूचक संकेतही त्यांनी दिले. (Maharashtra Politics)
दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या वृत्तांमुळे आधीच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दिल्लीत काही गुप्त बैठका झाल्याच्या चर्चांनाही या वक्तव्यामुळे अधिक बळ मिळाले आहे. मात्र, या सर्व चर्चांवर ठाकरे गटाकडून अद्याप ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. (Maharashtra Politics)
याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही ऑपरेशन टायगरबाबत सूचक विधान केले आहे. “ऑपरेशन टायगर योग्य वेळी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एकनाथ शिंदे हे अचूक राजकीय नेम साधणारे नेते आहेत,” असे ते म्हणाले. त्यामुळे महायुतीतील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राजकीय चर्चांना आणखी रंग चढला आहे. (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? ‘ऑपरेशन टायगर’बाबत संजय शिरसाट यांचं बेधडक विधान
दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्द्यावरही शिरसाट यांनी भूमिका स्पष्ट केली. “महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी भाषा येणे आवश्यक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई होईल,” असा इशारा त्यांनी दिला. (Maharashtra Politics)
तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या गुटखा विरोधी कारवाईचे स्वागत करत, अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “गुटखा माफियांविरोधातील कारवाई थांबता कामा नये. सरकार सर्वतोपरी संरक्षण देईल,” असेही शिरसाट म्हणाले. (Maharashtra Politics)
राज्यात विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)





