अयोध्येतील पराभवावर अमित शह म्हणाले,’जागांवर विजय-पराजय होतो, त्याचा संबंध रामलल्लाच्या अपमानाशी जोडू नका’

हरियाणातील निवडणूक प्रचारासाठी आता आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशात सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते प्रचारासाठी मोठमोठ्या रॅली काढत आहेत. दरम्यान, गुरुग्रामच्या बादशाहपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी… काँग्रेस पक्षाच्या तीन पिढ्यांनी लष्कराचा आदर केला नाही, वन रँक-वन पेन्शनची मागणी पूर्ण केली नाही. तुम्ही नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले आणि त्यांनी वन रँक-वन पेन्शनची तिसरी आवृत्तीही लागू केली आहे, आता नवीन वेतनासह पेन्शन दिली जाईल.
अयोध्येची जागा गमावल्यानंतर काय म्हणाले अमित शहा ?
लोकसभा निवडणुकीत अयोध्येच्या जागेवर भारतीय जनता पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. याबाबत गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, जागांवर विजय-पराजय होतो, त्याचा संबंध रामलल्लाच्या अपमानाशी जोडू नका. काँग्रेस पक्षाच्या राजवटीत रामलला तंबूत होते. पंतप्रधान मोदींनी भूमिपूजनही केले…मंदिर बांधले आणि प्राणप्रतिष्ठाही पार पाडली.” याआधी संपूर्ण विरोधक म्हणायचे की अयोध्येत भाजपचा पराभव झाला कारण त्यांनी रामलल्लाचा अपमान केला होता.
अग्निवीर योजनेबाबत काँग्रेसवर निशाणा साधला
गृहमंत्री अमित शहा यांनीही अग्निवीर योजनेबाबत काँग्रेसला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “अग्नवीर योजना फक्त सैनिकांना सैनिक बनवण्यासाठी आणली आहे. हरियाणातील प्रत्येक अग्निवीराला राज्य सरकार आणि भारत सरकारकडून पेन्शनसह नोकरी दिली जाईल. पाच वर्षांनंतर असा एकही अग्निवीर नसेल ज्याकडे नोकरी नसेल. पेन्शनसह नोकरी देण्यात येईल.”
गृहमंत्री अमित शहा यांनीही गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले, “यूपीए सरकारने हरियाणाला 41 हजार कोटी रुपये दिले होते, तर मोदी सरकारने गेल्या 10 वर्षांत हरियाणाला 2 लाख 92 हजार कोटी रुपये दिले होते. पीएम मोदींना हरियाणावर सर्वाधिक प्रेम आहे.”





