Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याचे चित्र आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजपने १५० प्लसचा नारा दिला आहे, ही बातमी समोर येताच. राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले असल्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमध्ये अंतर्गत धुसफुस होत असल्याच्या चर्चा होत आहेत. आगामी काळात जागावाटपावरून मतभेद होण्याची दाट शक्यता आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून नेत्यांची देहबोली आणि विधाने यामधून या गोष्टी प्रकर्षाने जाणवत आहेत. मुंबईत ठाकरे बंधुंचाच महापौर होईल या सगळ्यात सर्वांत जास्त चर्चा आहे, ती मुंबई महापालिका निवडणूक आणि मुंबईचा महापौर कोण होणार? याची. यातच आता शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत मोठं विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाने कितीही गर्जना केल्या तरी मुंबईत ठाकरे बंधुंचाच महापौर होईल, असे विधान त्यांनी केले आहे. तसेच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाले संजय राऊत? “भारतीय जनता पक्षाने कितीही गर्जना केल्या तरी मुंबईत ठाकरे बंधुंचाच महापौर होईल. यात दुमत असण्याचे कारण नाही. मुंबई, ठाण्यात ज्या पद्धतीचे वातावरण आहे त्यावरून भाजप-मिंधे गटाचा पराभव स्पष्ट दिसतोय ” हेही वाचा : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, व्यक्त केला आनंद भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी केलेल्या १५० प्लसच्या नाऱ्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी केलेले हे विधान महत्वाचे मानले जात आहे. “मला असे वाटते त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भाजप १५० प्लसचा नारा देईल. शिंदे गट १२० चा नारा देईल आणि अजित पवार किमान १०० जागा मुंबईत जिंकतील. आम्हाला सगळ्यांना राजकारणातून संन्यास घेऊन हरी हरी करत केदारनाथला जाऊन मोदींच्या गुफेत बसावे लागेल, असा मिश्किल टोला संजय राऊत यांनी लगावला. मुंबईचा महापौर मराठी आणि भगव्या विचारांचा होईल आमचा महापौर शंभर टक्के बसणार आणि सातत्याने बसणार. कोणाच्याही टेकू शिवाय बसणार. मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि सहकारी पक्ष असे एकत्र येऊन 55 ते 60 टक्के मतं घेत आहोत. आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. बहुमतासाठी भाजपला जे करावे लागते, तोडाफोडी, माणसं विकत घेणे हे आम्हाला करावे लागणार नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. मुंबईचा महापौर मराठी आणि भगव्या विचारांचा होईल, असेही संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले असून, या दौऱ्यावरून संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली. अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून ते पळत ज्यांच्याकडे जाणार नाही तर कुठे जाणार. अमित शहांनी त्यांना ती शिवसेना बनवून दिली असून बॉसच्या चरणात ते गेले असावेत, अशी खोचक टीका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. हेही वाचा : “कोण खासदार असतील किंवा त्यांचे पीए…; बीडच्या लेकीसाठी आमदार सुरेश धस मैदानात; या मागण्या करत म्हणाले…