Purandar Airport dispute: ‘मतं घेतली, आता पाठ फिरवली…’, सांत्वन करण्यासाठी आलेल्या सुप्रिया सुळेंवर शेतकर्यांकडून प्रश्नांचा भडीमार

दिवे – पुरंदर विमानतळ प्रकल्पाला विरोध करणारे स्थानिक शेतकरी आणि पोलिसांत शनिवारी (दि. 3) जोरदार झटापट झाली. याच कालावधीत कुंभारवळणमध्ये एका महिलेचे निधन झाले. या नंतर संबधित महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या खा. सुप्रिया सुळे यांच्यावर शेतकर्यांनी अक्षरशः प्रश्नांचा भडीमार केला. तुम्हाला मतदान मिळावे म्हणून रात्रंदिवस प्रचार केला, मात्र एवढा मोठा प्रकार होवूनही तुमचा एकही पदाधिकारी साधा फिरकला देखील नाही. अशा शब्दात त्यांना शेतकर्यांनी निरुत्तर केले. तुम्ही विमानतळाच्या बाजूने का शेतकर्यांच्या? असाही प्रश्न जाहीरपणे विचारला आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण या सात गावातील शेतकर्यांनी विमानतळ प्रकल्पाला जाहीरपणे विरोध केला असून कित्येक दिवस त्याविरोधात आंदोलन सुरु आहे. मागील महिन्यात सासवड येथील प्रशासकीय कार्यालाय्समोर तीन दिवस उपोषण केले, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील नेला .प्रकल्पबाधित गावांमध्ये जमिनीचा सर्व्हे करण्यास विरोध करणार्या शेतकर्यांवर पोलिसांकडून अमानुषपणे लाठीहल्ला झाला. यामध्ये कित्येक शेतकरी जखमी झाले. मात्र पोलिसांनी शेतकर्यांवर गुन्हे दाखल करून अटकही केली. याची दखल संपूर्ण राज्यस्तरावरून घेण्यात आली. मात्र मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकही पदाधिकार्याने शेतकर्यांची साधी विचारपूस सुद्धा केली नाही त्यामुळे शेतकर्यांचा मोठ्या प्रमाणात रोष होता.
उदाचीवाडीतील 120 एकर जमिनीमुळे तुम्ही शांत?
खासदार सुपियासुळे यांनी कुंभारवळण येथील मृत्यू झालेल्या अंजना कामथे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर शेतकर्यांची चर्चा करताना शेतकर्यांनी अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली. उदाचीवाडी येथील संतोष हगवणे यांनी बोलताना ताई तुम्ही पुरंदरला आल्यावर एक बोलता आणि मुंबई, दिल्लीमध्ये वेगळे बोलता. मग तुम्ही विमानतळाच्या कि शेतकर्यांच्या बाजूने ? असा थेट प्रश्न उपस्थित केला तर सातही गावात चर्चा आहे कि उदाचीवाडी मध्ये 120 एकर जमीन तुमची असल्याने तुम्ही शांत आहात का ? असा प्रश्न उपस्थित करून अक्षरशः गोंधळ उडवून दिला.
खासदार सुळेंसह पदाधिकार्यांना फुटला घाम
वनपुरी गावचे माजी सरपंच नामदेव कुंभारकर यांनी सुप्रिया सुळेंना म्हणाले की, आम्ही तीन दिवस उपोषण केले, पुण्याला मोर्चा नेला, आमच्यावर लाठीहल्ला होवून कित्येक शेतकरी जखमी झाले, संपूर्ण राज्याने दखल घेतली. मात्र तुमच्यासाठी दिवसरात्र प्रचार केला आणि तुम्च्यासाहित राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने साधी दाखल घेतली नाही. त्यामुळे आमचे चुकले का ? असा जहरी प्रश्न उपस्थित करताच त्यांना उत्तर देताना सुप्रिया सुळे यांच्यासह पवार गटाच्या पदाधिकार्यांना घाम फुटला होता.
चौकट : तुम्ही खरच आमचा प्रेतावरून विमानतळ करणार का ?
आमची पाच मुले अटक आहेत त्यांच्यावरील गुन्हे माघारी घ्यावेत अशी मागणी करतानाच पशुधन वाचविण्यासाठी आंदोलन करीत असताना तो आमचा गुन्हा आहे का ? तुम्ही निवडून येण्यासाठी आम्ही ठराव करून मतदान केले, आम्हाला कोणताही मोबदला नको आहे, मग आमच्यावर विमानतळ का लादत आहे ? विकास म्हणणे केवळ विमानतळ नाही, त्या पेक्षा 24 तास वीज द्या, 1972 मधील दुष्काळात शेतकरी जमीन सोडून गेले नाही मग आता का सोडून जायचे ? आम्ही कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही. आम्ही तुमच्या पाठीशी उभे असताना तुम्ही उभे राहावेत. आमचे एक एक शेतकरी मरत असताना तुम्ही खरच आमचा प्रेतावरून विमानतळ करणार का, असा जळजळीत सवाल कुंभारवळण गावच्या सरपंच मंजुषा गायकवाड उपस्थित केला आहे.
तुमच्यासाठी कोणाच्याही दारात यायला तयार
पुरंदर एक तर शिक्षक किंवा तरकारीमध्ये कामाला होता मात्र शरद पवार यांनी याच भागात पाणी आणून शेतीला दिले. माझ्या प्रत्येक भाषणात पुरंदरच्या शेतकर्यांना विमानतळाला विरोध नाही तर जागेला विरोध आहे. जिथे जागा असेल तिथे विमानतळ करा असे म्हणाले आहे. याजागेवर करा असे कधीही म्हणाले नाही. मी कोणत्याही विकासकामाला विरोध केला नाही आणि तुमची इच्छा नसेल तर करू नका. आपल्याला शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवायचे आहेत. तुमच्यासाठी कोणाच्याही दारात यायला तयार आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
“सतीश कुंभारकर आम्ही 50 वर्षे तुमच्या पाठीमागे उभे आहोत. तुमची प्रत्येकवेळी वेगवेगळी स्टेटमेंट येत आहेत. ज्यांची जमीन नाही त्यांची इच्छा आहे. आताचे आमदार पॅकेज दिल्यावर लोक लाइन लावतात असे म्हणतात. त्यामुळे आमची बाजू भक्कमपणे मांडावी.”
– सतीश कुंभार, ग्रामस्थ, कुंभारवळण
“माझी अथवा आमच्या परिवाराची पुरंदर तालुक्यात एक इंचही जमीन नाही. कोठे सातबारा असेल तर मला दाखवा, आपण निम्मीनिम्मी वाटून घेवू असे खुले आव्हान दिले. तसेच चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून संभ्रम निर्माण करू नये. दरम्यान तालुक्यातील सर्व नेत्यांना मी फोन करून मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना भेटून सांगू. ज्यांनी लाठी काठी चालविण्याचे आदेश दिले त्यांची मी स्वतः चौकशी लावणार आहे.”
– सुप्रिया सुळे, खासदार




