नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेनिमित्त सद्भावनेचा जो संदेश दिला आहे तो सर्वत्र पोहोचवण्यासाठी कॉंग्रेसतर्फे 30 जानेवारीपासून ‘हात से हात जोडो’ ही नवीन मोहीम सुरू केली जाणार आहे, अशी माहिती कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी आज येथे बोलताना दिली.
ते म्हणाले की, “हात से हात जोडो’ मोहिमेसाठी सर्व नियोजन आणि तयारी करण्यात आली आहे. जानेवारीनंतर घरोघरी प्रचार सुरू होईल. आम्ही राहुल गांधी आणि त्यांच्या यात्रेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवू,” असे दिग्विजयसिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
Terror Funding Case : चंदीगड आणि जम्मू-काश्मीरमध्ये NIA चे अनेक ठिकाणी छापे
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज दिल्लीत दाखल झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, यात्रेच्या पहिल्या दिवसापासून कॉंग्रेसने सांगितले आहे की ज्यांना भारत जोडो यात्रेत सामील व्हायचे आहे ते सहभागी होऊ शकतात. येथे सर्वांचे स्वागत आहे.