Maratha reservation : ‘मुंबई ही…’ मराठा आरक्षणावरून संजय राऊतांच सर्वात मोठं विधान, काय म्हणाले? पाहा….
Manoj jarange | Maratha reservation | Sanjay Raut – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी दिलेल्या शब्दाला जागून मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगेंच्या आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. तसेच, मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाला मुंबईत येण्यापासून थांबवू नये, असे म्हणत ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी काढलेल्या मोर्चाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, मराठा समाजाच्या मागण्या नवीन नाहीत. यापूर्वी महायुती सरकारने त्यांच्याशी चर्चा केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जरांगेंशी चर्चा सुद्धा केली आहे.
आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात, अशी भूमिका राऊतांनी स्पष्ट केली आहे. तसेच, जर का मुंबईत कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकते. त्याला सरकार परवानगी देते, तर मग मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी. मुंबई ही मराठी माणसांची आहे. ही मराठी माणसांची राजधानी आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असे त्यांनी म्हटले.





