Maharashtra Politics : शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का; जागावाटपाचा तिढा सुटण्याआधीच ‘या’ उमेदवाराने भरला अर्ज
Maharashtra Politics : महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतानाच राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे.

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप कायम असतानाच शिवसेना (शिंदे गट) ने भाजपला मोठा राजकीय संदेश दिला आहे. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे नेते रमेश बारसकर यांनी अधिकृत जागावाटपाचा निर्णय होण्यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. (Maharashtra Politics)
राज्यातील 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून आहे. मात्र जागावाटपाबाबत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना सहा जागांवर ठाम असून भाजपकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. (Maharashtra Politics)
अशा परिस्थितीत सोलापुरातून रमेश बारसकर यांनी अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. जिल्ह्यातील विकास निधी वाटप, विविध नियुक्त्या आणि राजकीय निर्णयांमध्ये शिवसेनेला विश्वासात घेतले जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. (Maharashtra Politics)
बारसकर म्हणाले, “निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचाच असेल.” (Maharashtra Politics)
दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीनेही सर्व 17 जागांवर उमेदवार देण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Politics)
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नसल्याने पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)





