Maharashtra Politics : मावळच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सुनील शेळके यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे समाज कल्याण खात्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. (Maharashtra Politics) सुनील शेळके यांना मंत्रीपद मिळाल्यास मावळ तालुक्याला तिसऱ्यांदा ‘लाल दिवा’ मिळणार असल्याचे बोलले जात आहे. याआधी मदन बाफना आणि बाळा भेगडे या दोन नेत्यांनी मंत्रीपद भूषवले होते. (Maharashtra Politics) मावळ तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपने आपली मजबूत पकड निर्माण केली होती. मात्र, अजित पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिल्यानंतर मावळच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके यांनी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करत मोठा राजकीय धक्का दिला होता. त्यानंतर दुसऱ्या निवडणुकीतही त्यांनी जवळपास एक लाख मतांच्या फरकाने विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. (Maharashtra Politics) Maharashtra Politics : अजित पवारांचा विश्वासू आमदाराला मिळणार मंत्रिपद? ‘हे’ महत्वाचं खातं मिळणार? त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित केले. लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत तसेच पंचायत समित्यांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यात शेळके यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. (Maharashtra Politics) राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक ताकद लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेळके यांना मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता अधिक बळावली आहे. मावळ, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील त्यांचा प्रभावही पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. (Maharashtra Politics) दरम्यान, याआधी सुनील शेळके यांच्या नावाची विधानसभा उपाध्यक्षपदासाठी चर्चा होती. मात्र, शोभेचे पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता त्यांची थेट मंत्रिमंडळात वर्णी लागणार का? याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics) या चर्चांवर प्रतिक्रिया देताना सुनील शेळके म्हणाले, मावळच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिलं आहे. मंत्रिमंडळात माझा समावेश व्हावा ही जनतेची इच्छा लवकरच पूर्ण होईल. (Maharashtra Politics)