Manoj Jarange : मनोज जरांगेंचे आंदोलन अधिक आक्रमक! पाणी अन् वैद्यकीय उपचारास नकार; उपोषणाचा आठवा दिवस
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यात सरकार अपयश आल्याचा आरोप करत, जरांगे यांनी पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार देऊन आंदोलन अधिक तीव्र केले आहे. (Manoj Jarange)
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर जरांगे पाणी आणि सलाईन घेण्यास सहमत झाले होते; मात्र आता त्यांनी ती संमती मागे घेतली आहे. आपल्या मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत कोणताही उपचार घेणार नाही, असे सांगत त्यांनी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून घेण्यासही नकार दिला. (Manoj Jarange)
जोपर्यंत सरकार आमच्या सर्व मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत मी काहीही घेणार नाही आणि कोणताही उपचारही करून घेणार नाही, असे जरांगे यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय पथकाने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. (Manoj Jarange)
नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण देण्यासाठी सुमारे ५८ लाख मराठा समाजाच्या नोंदींशी संबंधित काम सुरू केले जाईल, असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते; परंतु या दिशेने काहीही हालचाल झाली नाही, असा आरोप जरांगे यांनी केला. (Manoj Jarange)
आरक्षणाच्या मुद्द्याबाबतची माहिती सार्वजनिक घोषणांद्वारे गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सरकारचे आश्वासनही पाळले गेले नाही. मागण्यांबाबतचा निर्णय एक-दोन दिवसांत कळवला जाईल, असे सरकारी शिष्टमंडळाने यापूर्वी सांगितले होते. (Manoj Jarange)

तरीही, मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत. मागण्या मान्य न झाल्यास १२ सप्टेंबर रोजी मुंबईकडे कूच करण्याचा आपला निर्धारही त्यांनी पुन्हा व्यक्त केला. (Manoj Jarange)





