Manoj Jarange on Mumbai Movement ; “10 रुपये तिकीट, रेटून जेवण अन् गाडीत झोप” ; मनोज जरांगेंनी सांगितलं मुंबईतलं नियोजन

Manoj Jarange on Mumbai Movement। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेला मोर्चा अखेर मुंबईच्या आझाद मैदानात दाखल झाला आहे. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आले असून मुंबईत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलकांना आवाहन केले आहे. मराठा आंदोलकांमुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे आता पोलिसांसमोर हे मोठे आव्हान असणार आहे. त्यातच आता पोलिसांच्या आवाहनानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलकांना काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत.
मनोज जरांगेंचे मुंबईतले नियोजन Manoj Jarange on Mumbai Movement।
मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर दाखल झाल्यानंतर आंदोलकांना बोलताना,”तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग दिलंय. तिथून तुम्ही पाच ते दहा रुपयांत तुम्ही आझाद मैदानात येता, बिनधास्त गाड्या लावायच्या आणि रेल्वेनं यायचं जायचं. संध्याकाळी रेटून जेवायचं आणि त्या गाडीत झोपायचं. इकडं पाऊस अचानक येतो आणि अचानक जातो त्यामुळे तुम्हाला शरीराला सुद्धा त्रास होऊ नये याची काळजी घ्या, असं आवाहन जरांगे यांनी केले आहे.
गोंधळ गडबड करू नका
पुढे बोलताना त्यांनी,”काहीही झालं तर समाजाला किंमत द्या. समजा मिनिटा-मिनिटाला आपली खबर घेतो. आमची लेकर विजय घेऊन येतील याची त्यांना आशा आहे. गोंधळ गडबड करू नका. अधिकृत पार्किंगच्या ठिकाणी गाड्या लावा. हायवेवर लावायच्या नाहीत. मुंबईकराला त्रास झाला नाही पाहिजे ही आपली जबाबदारी आहे, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.
ड्राईव्हरला फोन लावायचा अन्… Manoj Jarange on Mumbai Movement।
दरम्यान, आपण आरक्षणाशिवाय माघार घेणार नाही. मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. आता मुंबईकरांना त्रास झाला नाही पाहिजे. प्रत्येक माणसानं ड्राईव्हरला फोन लावायचा आणि सांगायचं की पोलिस सांगतील तिथं जाऊन गाडी लावायची. मग ते कितीही लांब असू देत. एकही गाडी रोडवर राहता कामा नये. आपण सर्वांनी मुंबईत जाम केली ना.. आता दोन तासात मुंबई मोकळी करायची जबाबदारी पण आपली आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.





