Manoj Jarange : मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे.

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस असून सध्या ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आहेत. उपोषणामुळे अशक्तपणा आल्याने त्यांनी पाटोद्यात सलाईन घेतले असून पाणीही प्यायल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. (Manoj Jarange)
दरम्यान, डॉक्टरांकडून जरांगे पाटलांच्या प्रकृतीची तपासणी केली जात असून त्यांनी प्रवास करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या मुंबई दौऱ्यावर ठाम असून उद्या आपण मुंबईसाठी रवाना होणार असल्याचे त्यांनी म्हटले. (Manoj Jarange)
मी मुंबईला जाणार आहे, थांबणार नाही, मुंबईसाठी मी उद्या दुपारी निघणार. आज मला जाता आला नाही, आजच्या ऐवजी मी उद्या दुपारी 1 नंतर मुंबईला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिली. (Manoj Jarange)
सरकारकडून पश्चिम महाराष्ट्राचा नेहमी अपमान केला जातो, आम्हाला रस्त्यावर जास्त थांबवू नका. सरकारकडून ड्राफ्ट आला, राज्य सरकारचा ड्राफ्ट पाहून त्याबाबत बोलतो. मात्र, मी मुंबईला जाणार आहे, थांबणार नाही, मुंबईसाठी मी उद्या दुपारी निघणार. (Manoj Jarange)
आज मला जाता आला नाही, आजच्या ऐवजी मी उद्या दुपारी 1 नंतर मुंबईला जाणार आहे. पण, जे पाटोद्यात थांबले ते गावाकडे जातील, मला मुंबईला जाण्यापासून अडवल्यावर मी तुम्हाला बोलावून घेतो, असे म्हणत जरांगे यांनी त्यांच्या ताफ्यामागे आलेल्या मराठा बांधवांना गावाकडे, अंतरवालीत परतण्याचे सांगितले. (Manoj Jarange)
तसेच, मी शंकरगडाच्या महंतांच्या सांगण्यावरून सलायन आणि पाणी घेतले, असेही त्यांनी म्हटले. रस्त्यात कोणीच थांबू नये, मला कोण अडवते, मग महाराष्ट्राला सांगतो. (Manoj Jarange)
आता, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली मुक्काम नाही थेट मुंबई. मी सांगितले आज चला, ज्यादिवशी सांगेल त्या दिवशी मुंबईला यायचे, असे आवाहन त्यांनी मराठा बांधवांना केले. माझं ऐकायचं नसेल तर मी अंतरावलीला जातो, तुम्ही मुंबईला जा, असा उपरोधात्मक टोलाही त्यांनी लगावला. (Manoj Jarange)





