Mani Shankar Aiyar: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी त्यांच्याच पक्षातील नेत्यांविरुद्ध नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर, ज्येष्ठ नेते पवन खेरा आणि जयराम रमेश यांचे नाव घेऊन लक्ष्य केले. अय्यर यांनी दावा केला की, “काँग्रेस केरळ विधानसभा निवडणूक जिंकणार नाही”. अय्यर यांनी अलीकडेच सांगितले होते की, मुख्यमंत्री पिनारायी विजयन केरळचे मुख्यमंत्री राहतील. त्यामुळे त्यांनी केलेल्या या दाव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मणिशंकर अय्यर यांनी थरूर यांना पाकिस्तानविरोधी म्हटले. त्यांनी एक धक्कादायक दावा केला, थरूर पुढील परराष्ट्र मंत्री बनण्याची आकांक्षा बाळगतात.” त्यांनी पुढे म्हटले की,जयराम रमेश यांना त्यांचे पद वाचवायच आहे. त्यांनी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना कठपुतळी असेही म्हटले. Mani Shankar Aiyar: Mani Shankar Aiyar: अय्यर म्हणाले की, पवन खेरा यांनी दोन वर्षांपूर्वी म्हटले होते की ते कोणत्याही प्रकारे काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत नाहीत. तर हे काही नवीन नाही. ते काँग्रेस पक्षाचे कठपुतळी आहेत, प्रवक्ते नाहीत. ते एक निराश आयएएस अधिकारी आहेत जे याठिकाणी येऊन गेल्या दोन वर्षांपासून मला शिवीगाळ करत आहेत.” असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. काँग्रेस पक्षाच्या अडचणींबद्दल बोलताना अय्यर म्हणाले, “मला काँग्रेस जिंकायची आहे, पण मला वाटत नाही की ते जिंकेल.” अय्यर यांनी याचे श्रेय काँग्रेसच्या फुटलेल्या नेत्यांना दिले, ते म्हणाले की ते डाव्या विचारसरणीपेक्षा एकमेकांचा जास्त द्वेष करतात.” काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांच्या विधानापासून स्वतःला दूर ठेवले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, “मणिशंकर अय्यर यांचा गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसशी कोणताही संबंध नाही. ते केवळ त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार बोलतात आणि लिहितात”. Mani Shankar Aiyar: