Mandhardev – ‘इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी’ संतांच्या या अभंगाप्रमाणेच अगदी मांढरदेव, ता. वाई येथे 51 वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात झाला. यानिमित्ताने सगळे गाव भक्तिरसात न्हाऊन गेेले होते. सप्ताहानिमित्त ज्ञानेश्वर वाचन, प्रवचन, कीर्तन उपक्रम सुरु असून यामध्ये अबालवृध्दांचा सहभाग खर्या अर्थाने वारकरी संप्रदायाची परंपरा उज्ज्वल करत आहे. दरम्यान, शेवटच्या दिवशी सोमवारी 16 तारखेस या अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याचा कार्यक्रम होणार आहे. मांढरदेवमध्ये गेल्या 51 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह भक्तीभावाची रुजवण करत साजरा होत आहे. 1975 साली गावातील त्यावेळच्या पाच ते दहा लोकांनी एकत्र येऊन या अखंड हरिनाम सप्ताहाचे रोप लावले होते आणि त्यांच्या मागे येणार्या त्यांच्या पिढ्यांनी या रोपाचे जतन करून या रोपाचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर केले आहे. येथील युवकांनी यामध्ये आपला सहभाग देऊन या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दैनंदिन होणार्या प्रत्येक कार्यक्रमांमध्ये येणार्या माऊली भक्तांसाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या आहेत. त्यामध्ये पहाटे काकड आरती साठी येणार्या महिलांमधून निवडल्या जाणार्या मानकर्यास आकर्षक भेटवस्तू दिली जाते. संध्याकाळच्या हरिपाठास येणार्या विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. त्या अन्नदान दात्यांस या अखंड हरिनाम सप्ताह मांढरदेव यांच्याकडून वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती व ग्रंथ भेट म्हणून दिले जातात. कीर्तन श्रवण करण्यासाठी येणार्या महिला व पुरुषां मधून या अखंड हरिनाम सप्ताहातील माऊली सेविकांकडून त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून त्यातून प्रत्येकी दोन दोन भाग्यवान मानकरी निवडले जातात. हा मान मिळालेल्या महिला मानकर्यास पैठणी साडी व दुसर्या मानकर्यास स्वामींची मूर्ती भेट दिली जाते. तसेच पुरुष मांनकर्यास विठ्ठल,रुक्मिणी देवांच्या मूर्ती सप्रेम भेट दिल्या जातात. या सर्व भाग्यवान मानकरांना या सर्व वस्तू कीर्तनकार महाराजांच्या हस्ते दिल्या जातात. सप्ताहात महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी रोज केला जातो. त्या कार्यक्रमास गावातील व परिसरातील सर्व ग्रामस्थ देवीला आलेले भाविक मिळून रोज 800 ते 1000 माऊलीभक्त या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.