कोलकाता – प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाची फेररचना केली असून बुधवारी 9 नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. विधानसभा निवडणुकीत ममता यांच्या तृणमूल कॉंग्रेसच्या झालेल्या शानदार विजयानंतर भारतीय जनता पार्टीला रामराम करत तृणमूलमध्ये दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांना कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान देण्यात आले आहे.
पार्थ चॅटर्जी यांच्या हकालपट्टीनंतर सरकारची प्रतिमा डागाळली आहे. त्यात सुधारणा करत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न ममता यांनी केला आहे. अनेक विभागांना मंत्री नाहीत व इतक्या खात्यांचा कारभार आपण एकटे पाहू शकत नाही त्यामुळे हा विस्तार करण्यात आला असल्याचे ममता यांनी सांगितले.
Vice President Election : मार्गारेट अल्वा यांना आणखी दोन पक्षांचा पाठिंबा
सुप्रियो यांच्या व्यतिरिक्त स्नेहाशिष चक्रवर्ती, पार्थ भौमिक, उदयन गुहा आणि प्रदीप मुजुमदार यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. तर बिरभा हंसदा, बिप्लब रॉयचौधरी, ताजमुल हुसैन आणि सत्यजीत बर्मन यांना राज्य मंत्री करण्यात आले आहे. प. बंगालमध्ये 7 नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली जाण्याची घोषणा ममता यांनी अगोदरच केली आहे. त्यामुळे बंगालमधील जिल्ह्यांची संख्या 30 होणार आहे.
योगी सरकारला आपल्याच आश्वासनाचा विसर; आक्रमक शेतकरी “हे” पाऊल उचलण्याच्या तयारीत