Breaking News : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.! आता 2,100 रुपये मिळणार? PM मोदींच्या अहवालात मोठी अपडेट
महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण‘ योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या योजनेतील मासिक आर्थिक मदत 1,500 रुपयांवरून 2,100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, ही वाढ नेमकी कधी लागू होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (EAC-PM) सादर केलेल्या नव्या अभ्यास अहवालात अशा योजनांच्या आर्थिक मदतीत वेळोवेळी वाढ करण्याची शिफारस करण्यात आल्याने 2,100 रुपयांच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार का? (Breaking News )
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना ही महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाकांक्षी योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने ही मदत 2,100 रुपये करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे लाखो महिला या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
अद्याप राज्य सरकारकडून 2,100 रुपयांबाबत कोणतीही अधिकृत अंमलबजावणीची तारीख जाहीर करण्यात आलेली नसली, तरी केंद्र स्तरावर झालेल्या महत्त्वाच्या घडामोडीमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
अहवालात काय म्हटले आहे? (Breaking News )
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (EAC-PM) प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालात महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ओडिशातील ‘सुभद्रा योजना’ यांचा सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.
अहवालात म्हटले आहे की, महागाई आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाचा विचार करता अशा थेट आर्थिक मदत देणाऱ्या योजनांच्या रकमेचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. गरज भासल्यास लाभार्थींना दिली जाणारी आर्थिक मदत वाढवण्याचाही विचार सरकारने करावा.
विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांतील सरासरी शिल्लक 84 टक्क्यांनी वाढली, तर त्यांच्या मासिक खर्चात 46 टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा खर्च प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण आणि घरगुती गरजांसाठी करण्यात आला.
अहवालात महिलांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना डिजिटल साक्षरता, कौशल्य विकास आणि स्वयं-सहाय्यता गटांशी जोडण्याची शिफारसही करण्यात आली आहे, जेणेकरून त्या दीर्घकालीन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतील.
80 लाख महिला योजनेतून अपात्र :
दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर पडताळणी करण्यात आल्यानंतर सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत.
ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न करणे
योजनेच्या पात्रता निकषांची पूर्तता न करणे
अर्जातील त्रुटी किंवा अपूर्ण माहिती
या कारणांमुळे संबंधित महिलांच्या खात्यात जमा होणारी 1,500 रुपयांची मदत बंद करण्यात आली आहे.
मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, पात्र असलेल्या कोणत्याही महिलेला योजनेतून वगळण्यात आलेले नाही. डेटाबेस पडताळणी आणि निकषांनुसार अपात्र ठरलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ बंद करण्यात आला आहे. असं म्हंटलं आहे.







