Mallikarjun Kharge : मोदी लोकांच्या संपर्कात नाहीत; मल्लिकार्जुन खर्गे यांचा पंतप्रधानांवर आरोप
शिक्षण, रोजगार आणि युवा कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधील कार्यक्रम (Mallikarjun Kharge) एका राजकीय प्रचारात बदलला.

Mallikarjun Kharge : शिक्षण, रोजगार आणि युवा कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधील कार्यक्रम (Mallikarjun Kharge) एका राजकीय प्रचारात बदलला. टीकात्मक प्रश्न दाबून टाकण्यासाठी आणि प्रशासकीय अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधकांना अपमानास्पद विशेषणे लावणे ही एक नित्याची रणनीती बनली आहे.
आता जबाबदारी टाळण्यासाठी मोदी राजकीय विशेषणांचा वापर करत आहेत,ताशा शब्दांत पंतप्रधान मोदींवर काॅंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी टिका केली. खर्गे म्हणाले, काल तुम्ही दिल्ली विद्यापीठातील श्री राम कॉलेजला भेट दिलीत. देशातील युवा, शिक्षण आणि त्यांचे भविष्य यावर संवाद साधण्याची ती एक संधी होती. पण दुर्दैवाने, तरुणांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी, ते भाषण पुन्हा एकदा राजकीय प्रचारात बदलले.
मोदी स्वतःचे अपयश लपवण्यासाठी विरोधकांसाठी नवीन विशेषणे शोधून लोकशाहीतील प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषणे बदलत असली तरी मोदी सरकारची जनविरोधी धोरणे मात्र तशीच राहतात.
खर्गे (Mallikarjun Kharge) पुढे म्हणाले की, मोदीजींची कार्यपद्धती लोकशाहीत प्रश्न दाबण्यासाठी दरवर्षी विरोधकांना नवीन विशेषण द्यायचे… जेणेकरून त्यांचे स्वतःचे अपयश लपलेले राहील! नाराज फूफा (नाराज काका), दिमागी नक्षल (बौद्धिक नक्षलवादी), अर्बन नक्षल, खान मार्केट गँग, आंदोलनजीवी, परजीवी अशी विशेषणे बदलत राहतात, पण मोदी सरकारची जनविरोधी धोरणे बदलत नाहीत.
खर्गेंनी (Mallikarjun Kharge) दावा केला की, तरुणांच्या रिपोर्ट कार्डमध्ये वाढती बेरोजगारी, सरकारी भरती प्रक्रियेतील दीर्घकाळ प्रलंबित बाबी, पेपरफुटी, महागडे शिक्षण, शिष्यवृत्तीच्या संधी आकुंचन पावणे आणि विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर वाढता दबाव या गोष्टींचा समावेश आहे. मोदीजी, जेव्हा तुम्ही लोकांच्या आवाक्याबाहेर जाता, तेव्हाच संपर्क’ साधण्याची गरज भासते.






