Mallikarjun Kharge : लोकसभेचे सध्याचे संख्याबळ 25 वर्षे कायम ठेवावे; मल्लिकार्जुन खर्गे यांचे मोदींना पत्र
कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून विविध मागण्या केल्या. लोकसभेचे सध्याचे ५४३ जागांचे संख्याबळ आणखी २५ वर्षांसाठी कायम ठेवले जावे.

Mallikarjun Kharge : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून विविध मागण्या केल्या. लोकसभेचे सध्याचे ५४३ जागांचे संख्याबळ आणखी २५ वर्षांसाठी कायम ठेवले जावे. केंद्र सरकारचे मतदारसंघ फेररचनेविषयीचे प्रस्ताव सर्व राजकीय पक्षांसमोर मांडले जावेत, असे आवाहन खर्गे यांनी केले आहे.
महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि मतदारसंघ फेररचना याबाबींना जोडणारे विधेयक (Mallikarjun Kharge) पुन्हा आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, खर्गे यांनी मोदींना पाठवलेल्या पत्राचे महत्व वाढले आहे.
मतदारसंघ फेररचनेशी संबंधित प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी. त्या प्रस्तावांचा अभ्यास करण्यासाठी राजकीय पक्ष आणि राज्य सरकारांना पुरेसा वेळ दिला जावा.
महिलांसाठीच्या एक-तृतीयांश आरक्षणाची अंमलबजावणी २०२९ यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीपासून केली जावी, अशा मागण्या खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केल्या. सरकारने याआधी लोकसभेत १७ एप्रिल यादिवशी महिला आरक्षण अंमलबजावणीसाठी मतदारसंघ फेररचनेचा समावेश असणारे घटनादुरूस्ती विधेयक मांडले. मात्र, सरकार आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत गाठू न शकल्याने ते विधेयक फेटाळले गेले.






