Maharashtra Politics : राज्यात काँग्रेसला मोठं भगदाड! बड्या नेत्यासह १९ नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत, राजकारणात मोठी उलथापालथ
Maharashtra Politics : विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी मोठी घडामोड घडली आहे.

Maharashtra Politics : विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी मोठी घडामोड समोर आली आहे. दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह १९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील नंदनवन निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. (Maharashtra Politics)
दर्यापूर नगर परिषदेतील काँग्रेसच्या नगराध्यक्षा आणि १९ नगरसेवकांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे. याशिवाय अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. (Maharashtra Politics)
प्रहारसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही प्रवेश
या प्रवेश सोहळ्यात प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष तसेच कर्नाटकातील बेळगाव येथील विविध संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. (Maharashtra Politics)
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. राज बोरकर, संदीप मेश्राम, सचिन कुंभारे, केतन सहारे, पंकज बोरकर आणि श्रीकांत रामटेके यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रहारचे बेळगाव जिल्हाध्यक्ष शिवकुमार बोधले, तालुकाध्यक्ष दीपक बोधले आणि युवा अध्यक्ष रोहित पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
‘दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही’
पक्षप्रवेशानंतर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकासकामांना महायुती सरकारची पूर्ण साथ राहील, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
यावेळी त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या कार्याचे कौतुक केले. विदर्भातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी बच्चू कडू यांनी सातत्याने संघर्ष केल्याचे शिंदे म्हणाले. (Maharashtra Politics)
‘विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्यांना शिवसेनेत स्थान’
विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे वाढता ओढा हा जनविश्वासाचा पुरावा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला शिवसेनेत सन्मानाचे स्थान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)
महाराष्ट्र हे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असल्याचा उल्लेख करत गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हे महायुती सरकारचे ध्येय असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. (Maharashtra Politics)
या पक्षप्रवेशामुळे दर्यापूरसह अमरावती जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात या घडामोडीचा कितपत परिणाम होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : मोठी घडामोड..! शिवसेनेतील बड्या नेत्याचा राजीनामा, राज्याच्या राजकारणात खळबळ






