Maharashtra Election : “महाराष्ट्राचे निकालही हरियाणाप्रमाणेच असतील”; चंद्रबाबू नायडू यांनी केले भाकित

Maharashtra Election : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. भाजपने हरियाणामध्ये पूर्ण बहुमत मिळवले आहे, तर जम्मू-काश्मीरमध्येही विक्रमी २९ जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी दोन्ही राज्यात काँग्रेसची कामगिरी खराब झाली आहे.
भाजपच्या या विजयाबद्दल एनडीएच्या मित्रपक्षांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आता आगामी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांबाबत असे भाकीत केले आहे, ज्यामुळे भाजपला आनंद होऊ शकतो.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल हरियाणाप्रमाणेच असतील. त्यावर मला कोणतीही शंका नसल्याचे नायडू म्हणाले.
मला खात्री आहे की हे होईल. चंद्राबाबू नायडू असेही म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये केवळ सामान्य स्थितीच नाही तर भाजप तेथे सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.
एक देश, एक निवडणूक यावरही नायडू यांनी भाष्य केले
नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आणि म्हटले की देशाने एक राष्ट्र एक निवडणूकला पाठिंबा देण्याची गरज आहे कारण वारंवार निवडणुकांमुळे विकास कार्यात अडथळा येतो. ते पुढे म्हणाले की, हरियाणात भाजपचा विजय आणि जम्मू-काश्मीरमधील मतांची टक्केवारी हा ऐतिहासिक विजय आहे.
हरियाणात भारतीय जनता पक्षाच्या विजयाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही अभिनंदन केले आहे. नितीश कुमार म्हणाले भारतीय जनता पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा.
हरियाणाच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जेडीयूचे खासदार आणि केंद्रीय मंत्री लालन सिंह यांनीही म्हटले आहे की, हरियाणा निवडणुकीच्या निकालाने हे सिद्ध केले आहे की पंतप्रधान मोदी अजूनही देशात लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता वाढत आहे.





