Eknath Shinde : शिवसेनेत उभी फूट का पडली? सुप्रीम कोर्टात शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितली ‘इनसाइड स्टोरी’!
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे (Eknath Shinde) वकील नीरज कौल यांनी शिवसेनेत उभी फूट नेमकी का पडली, याचे मुख्य कारण थेट कोर्टासमोर मांडले.

Eknath Shinde : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे (Eknath Shinde) वकील नीरज कौल यांनी शिवसेनेत उभी फूट नेमकी का पडली, याचे मुख्य कारण थेट कोर्टासमोर मांडले. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर युक्तिवाद करताना कौल यांनी पहिल्याच फटक्यात काँग्रेस आणि भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवले.
जनतेचा कौल भाजप-शिवसेना युतीला मिळाला होता, मात्र निकालानंतर ज्यांच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष केला, त्याच काँग्रेससोबत हातमिळवणी करून अनैसर्गिक आघाडी करण्यात आली.
या निर्णयामुळे (Eknath Shinde) पक्षामध्ये प्रचंड खदखद आणि असंतोष निर्माण झाला होता आणि याच असंतोषातून शेवटी आमदारांनी उठाव केला, असा रोखठोक दावा त्यांनी न्यायालयात केला.
आमचीच मूळ शिवसेना असल्याचा पुनरुच्चार करताना कौल यांनी विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे नसून एकच आहेत, या मुद्द्यावर भर दिला. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर पक्षाच्या रचनेत मनमानी बदल करण्यात आले असून संपूर्ण पक्ष एका व्यक्तीच्या मर्जीवर चालवला जात होता, असा गंभीर आरोप त्यांनी ठाकरे गटावर केला.
एका सहीने जर पक्ष चालणार असेल, तर कार्यकर्त्यांच्या निष्ठेला काय अर्थ उरतो असा सवाल उपस्थित करत, ज्या पक्षात लोकशाही मार्गाने अंतर्गत निवडणुका होत नाहीत, तो पक्ष राज्य किंवा देशाच्या निवडणुका काय लढवणार, असा थेट घणाघात त्यांनी (Eknath Shinde) केला. या महत्त्वाच्या युक्तिवादानंतर आता अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाशी संबंधित पुढील सुनावणी १५ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.






