Maharashtra Politics : भाजपला आता शिंदेंची गरज नाही; ‘या’ नेत्याची जहरी टीका
भाजपला आता शिंदे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाची कोणतीही गरज (Maharashtra Politics) उरलेली नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत, भाजपला आता शिंदे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाची कोणतीही गरज (Maharashtra Politics) उरलेली नाही, असे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
एका सोशल मिडीया पोस्टमध्ये (Maharashtra Politics) सपकाळ यांनी म्हटले की, मंत्रालय संबंधित प्रश्न असोत, स्वयंघोषित बाबा अशोक खरातचे प्रकरण असो किंवा सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक असो, प्रत्येक ठिकाणी शिंदे यांना अडचणीत आणले जात आहे. शिंदे यांनी स्वतःच्याच पक्षाचा विश्वासघात केला आणि ते मुख्यमंत्री बनले.
आता भाजपला शिंदे यांची गरज उरलेली नाही, म्हणूनच सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या एका आमदाराला आपल्याकडे वळवून घेतले.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली होती.
पण अशा वेळी शिंदे यांनी काय केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिंदे (Maharashtra Politics) यांनी आपला संताप केवळ विधानसभेतच व्यक्त केला. भाजप हळूहळू शिवसेनेच्या सर्व आमदारांना आपल्याकडे वळवून घेईल, असा दावा सपकाळांनी केला आहे.






