Maharashtra Politics : महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल? बैठकीला तब्बल 24 आमदार गैरहजर; बड्या नेत्यांचाही समावेश
Maharashtra Politics : महाविकास आघाडीला (MVA) आता आमदारांच्या पातळीवर दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आला असून महाविकास आघाडीतील घडामोडींनीही लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या बैठकीतील अनुपस्थितीची चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics)
आज मुंबईत महाविकास आघाडीच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला तब्बल 24 आमदार गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अनुपस्थित राहिलेल्या आमदारांमध्ये काही वरिष्ठ आणि प्रभावी नेत्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : राज्याला मिळाले 16 नवे आमदार; महायुतीची ताकद आणखी वाढली
विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. राज्यातील विविध प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडण्याबाबत चर्चा अपेक्षित होती. मात्र मोठ्या संख्येने आमदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
काही आमदारांनी वैयक्तिक आणि मतदारसंघातील कार्यक्रमांमुळे बैठकीला उपस्थित राहता आले नसल्याचे सांगितले जात असले, तरी काहींच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे विशेष लक्ष लागले होते. त्यामुळे 24 आमदारांच्या अनुपस्थितीमागे नेमके कारण काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. (Maharashtra Politics)
या 24 आमदारांची दांडी
महाविकास आघाडीच्या एकूण 59 आमदारांपैकी 35 आमदार आजच्या बैठकीला उपस्थित होते. तर 24 आमदारांनी या बैठकीला दांडी मारली आहे. यामध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, अमित देशमुख, रोहित पवार, अभिजीत पाटील, विकास ठाकरे, संदीप क्षीरसागर, जयंत पाटील या बड्या नेत्यांचा समावेश आहे. या आमदारांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. (Maharashtra Politics)






