श्रीनगर – काश्मीरातील स्थिती सुधारेपर्यंत सुरक्षिततेसाठी काश्मीर खोऱ्यातील सर्व काश्मीरी पंडितांना जम्मूच्या सुरक्षीत भागात स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी डेमोक्रॅटिक आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी केंद्र सरकारला केली आहे.
काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते म्हणाले की, रोजगारापेक्षा जीवन महत्त्वाचे असून सरकारने काश्मिरी पंडितांची तातडीने जम्मूमध्ये बदली केली पाहिजे.
सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी सेवांमधील बहुसंख्य काश्मीरी पंडित कर्मचारी रजा घेऊन जम्मू भागात राहण्यास गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, काश्मीर खोऱ्यात सेवा करणाऱ्या काश्मिरी पंडितांनी कामावर त्वरीत हजर राहावे, हजर न राहिल्यास त्यांना त्यांचे वेतन दिले जाणार नाही.
Bank Loan Fraud Case : उद्योगपती ‘वेणूगोपाल धूत’ यांना CBI कडून अटक
आम्हाला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, अशीच एक घटना बुधवारी रात्री घडली आहे. आम्हाला सांगण्यात आले की, आमच्या पोस्टिंगच्या ठिकाणी एक पोलिस तैनात केला जाईल. पण प्रशासनाच्या सुरक्षा धोरणावर आमचा विश्वास नाही, असे काश्मिरी पंडितांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर गुलामनबी आझाद यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून काश्मीरमध्ये पंडितांच्या टार्गेट किलिंगची मालिका सुरू आहे.