मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेमध्ये उघड दोन गट पडले आहेत. या बंडामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचा संघर्ष निर्माण झाला आहे. शिंदे गटाने खरी शिवसेना आम्हीच आहोत, असा दावा केल्यामुळे दोन्ही गट एकमेकांवर टोकाची टीका करताना दिसत आहेत.
मालेगावमधील सभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देताना आनंद दिघेंसोबत जे घडलं त्याचा मी साक्षीदार आहे. ज्यावेळी मी बोलेन तेव्हा भूकंप होईल, असा इशारा दिला आहे. या विधानावर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी ट्वीट करून एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा; म्हणाले, “मला बोलण्यास भाग पाडू नका”
केदार दिघे म्हणाले, “मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?”, असं ट्विट केदार दिघे यांनी केलं आहे.