बेंगळुरू – कॉंग्रेसची ( Congress ) ‘भारत जोडो यात्रा’ म्हणजे राहुल गांधी नावाचे ‘अयशस्वी क्षेपणास्त्र’ पुन्हा लॉंच करण्याचा आणखी एक प्रयत्न असल्याची टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांनी केली आहे. राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ 1,000 किलोमीटरचा टप्पा गाठून बल्लारी येथे दाखल होत असताना बोम्मई यांनी ही टीका केली. बोम्मई म्हणाले की देश एकसंध आहे आणि संघवादावर देशाचा पूर्ण विश्वास आहे. देश मजबूत असताना या भारत जोडो यात्रेला काही अर्थ नाही.
महात्मा गांधीजींनी म्हटले होते, “जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे माझ्या बैलगाडीचे दोन…”
राहुल गांधी नावाचे क्षेपणास्त्र यापूर्वी निकामी झाले आहे. आता, ते पुन्हा रिलॉंच केले जात आहे. याशिवाय यात्रेला काही अर्थ नाही. संघराज्यावर विश्वास ठेवून राष्ट्र संघटितपणे प्रगती करत असताना यात्रेमागील हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. देश जागतिक स्तरावर एक मजबूत मार्गाने पुढे जात असताना आता भारताला एकत्र आणण्याच्या अशा स्वरूपाच्या यात्रेची कोणतीही गरज नाही. G-7 देशांसह सर्व देश आर्थिक मंदीचा सामना करत असताना, भारत सात टक्क्यांच्या जीडीपी वाढीसह पुढे जात आहे.
भाजपला मोठा धक्का; “हे’ माजी मंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
कॉंग्रेस ( Congress ) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 1999 मध्ये बल्लारी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि या मतदारसंघातून यापुढेही लढत राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते, याची आठवण करून देऊन बोम्मई म्हणाले की त्याबद्दल मतदारांचे आभार न मानता, त्यांनी बल्लारी सोडली आणि त्या उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे परत गेल्या. कॉंग्रेसने ( Congress ) पुर्वी 3,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते, पण एक पैसाही दिला नाही, भाजपच्या ‘जन संकल्प यात्रे’ला कर्नाटकात मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.