“न्याययंत्रणा ताब्यात ठेवण्याचं…”; भाजप महिला प्रवक्त्याची न्यायाधीशपदी नियुक्तीवरून संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut | भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. रोहित पवार यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आरती साठे यांच्या नियुक्तीवरून हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत आरती साठे यांच्या नियुक्तीवर बोलताना म्हणाले की, “हा भारतीय न्यायव्यवस्थाचा दशावतार आहे. भाजप प्रवक्त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती केली जात आहे. मुंबई हायकोर्टात भाजप प्रवक्त्यांची न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली आहे. चेन्नई कोर्टामध्येही भाजपच्या प्रवक्त्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एखाद्या पक्षाचा प्रवक्ता त्या विचारधारेला बांधील असतो. मुंबई उच्च न्यायालयातील पाच ते सहा न्यायमूर्ती हे शाखेत जात होते. सुप्रीम कोर्टात नेमणूक घडवून देशाची न्याययंत्रणा ताब्यात ठेवण्याच भाजपच कारस्थान आहे. ” Sanjay Raut |
रोहित पवारांची तीव्र शब्दांत टीका
तर रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीका करत म्हटले की, “सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीशपदी नियुक्ती हा लोकशाहीवरचा सर्वात मोठा आघात आहे. केवळ पात्रता आहे म्हणून राजकीय व्यक्तींना न्यायाधीशपदी नेमणे म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संविधानातील ‘सेपरेशन ऑफ पॉवर’ तत्त्वाला या नियुक्तीमुळे बाधा येईल आणि सत्तेचे केंद्रीकरण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. Sanjay Raut |
हेही वाचा :
उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; इंडिया आघाडीच्या बैठकीकडे लक्ष, रणनीती ठरणार?





